मन शांती असणे ही जगातील सर्वात अमुल्य गोष्ट आहे जी कुठल्याही दुकानात विकत मिळत नाही .मन शांती आवश्यक असेल तर ती मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते .
परिस्थिती ला उघड्या डोळयांनी सामोरे जा :-
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात चढ -उतार ,सुख-दुख यांचा पाठशिवणीचा खेळ हा सतत सुरु असतो .कधी दुख पुढे असते तर कधी सुख पुढे असते ह्या खेळात आपले मन हे पंचाच्या भूमिकेत असते .मन निकल कसा देते यावर आपल्या जीवन रुपी खेळाचा प्रवास अवलंबून असतो .मन जर तटस्थ राहिले तर परिस्थिती नियंत्रणात राहाते,मनाने जर दगाबाजी केली तर मग मात्र निकालत पक्ष पाती पणा होऊ शकतो व आपण जीवन रुपी सामना गमाउ शकतो यासाठी जीवना कडे उघड्या डोळ्यांनी बघणे गरजेचे आहे .जीवनातील सर्व प्रसंगाना धीराने समोरे जाऊन त्या वर धीराने मात करणे आवश्यक आहे .यासाठी खलील काही उपाय करणे आवश्यक आहे .
क्रिया -प्रतिक्रिया च्या चक्रात अडकू नका ;-
मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा :-
भोवतालची परीस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा :
मन शांती साठी योगा हा योग्य पर्याय :-
ध्यान करण्यासाठी आवश्यक बाबी :-
- शांत परिसर - शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता.
- नियमित ध्यान करा - दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
- साथीदारांसह ध्यान करा - आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
- ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा –यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल.
- विचारांचे निरीक्षण करा - विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
- घाई करू नका - दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतेय नां पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका.
- पोट भरलेले नाही ना, याची खात्री करून घ्या. – कारण पोट टच्च असल्यास झोप येते.
- ध्यान करण्याचे फायदे :-
१. ध्यान आपल्याला मानसिक रित्या कणखर बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीतआनंदी राहू शकतो.
२. आपल्याला मनसिक शांती प्राप्त होते त्यामुळे भोवतालच्या वातावरणावर आपला सकारात्मक प्रभाव पडतो
३. भावनिक लवचिकता वाढते.
४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
५. मनाला पडणारा ताण-तणाव कमी होऊन मन शांतीच्या दिशेने आपण वाटचाल करू लागतो . त्यामुळे निरोगी मन, निरोगी आयुष्य ,मन शांती यासाठी ध्यान नक्कीच लाभ दायक आहे .
१. ध्यान आपल्याला मानसिक रित्या कणखर बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीतआनंदी राहू शकतो.
२. आपल्याला मनसिक शांती प्राप्त होते त्यामुळे भोवतालच्या वातावरणावर आपला सकारात्मक प्रभाव पडतो
३. भावनिक लवचिकता वाढते.
४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
५. मनाला पडणारा ताण-तणाव कमी होऊन मन शांतीच्या दिशेने आपण वाटचाल करू लागतो . त्यामुळे निरोगी मन, निरोगी आयुष्य ,मन शांती यासाठी ध्यान नक्कीच लाभ दायक आहे .