आदरणीय साने गुरजी यांनी म्हटल्या प्रमाणे,"मुले ही देवा घरची फुले असतात.
मुल वाढवताना सर्वसाधारण काही महत्वाच्या बाबी:-
१)मुलांकरिता उत्तम भेट म्हणजे पालकांची वेळ
मुलांशी सहज संवाद साधा,मुलानला त्यांच्या लहानपना पासूनच सुसंवाद साधणे जमले पाहिजे.जेणे करून त्याला त्याच्या भावी काळात समाजात मिसळताना अडचण येणार नाही,यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनला वेळ देणे
मुलांनला कुठल्याही प्रकारची शिकवणूक देताना मुलांनला मला वेळ नाही अशी सबब देताना आपण विजेचा शोध लावणाऱ्या एडिसन कडे जेवढा वेळ होता तेवढा तर अपल्या कडे नक्कीच असणार .
२ )आपल्या मुलाला समजून घ्या :-
सकारात्मक शब्दाचे तरंग आपल्याला स्वास्थय प्रदान करतात ,त्या मुळे मुलांशी बोलताना नेहमी सकारात्मक बोलावे आणि आशावादी शब्दांचा वापर करावा .मुलांच्या शंका त्यांना पडणारे प्रश्न याकडे दुर्लक्ष न करता ते समजून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा .सुरवातीला माणूस सवयी बनवतो नंतर तो त्या सवयीचा गुलाम बनतो ,त्यामुळे मुलानला चांगल्या सवयी लावा कारण याच सवयी पुढे चालून त्यांचे भविष्य घडवणार आहेत .
३)इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करू नका :-
सर्वप्रथम प्रत्यक मुलास हे सांगा कि.अपयश अशी काही बाब नसतेच ते म्हणजे प्रयत्न करताना ज्या प्रमाणे अडथळे येतात त्या प्रमाणे अपयश म्हणजे अडथळयाची शर्यत असते ती ज्या समर्थ पणे आपण पार करू तेवढे आपण सक्षम होतो.अपयश म्हणजे निरंतर शिकण्याची प्रक्रिया असते,त्यामुळे जरी अपयश आले तरी न खचता पुन्हा नव्यानी सुरवात कारणे बंद करयाचे नसते हे शिकवा आणि हे सांगा कि,अपयश हि काही शेवटची संधी नसते ,जीवनात संधी येतात जातात पण त्या काही शेवटच्या नसतात .
मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी साठी त्यांच्या आवडी निवडी जोपासल्या पाहिजेत तरच मुल त्याच्या भावी जीवनात सुखी व समाधानी राहील यात तीळ मात्र शंका नाही ,यासाठी मुलांन मधील सुप्त गुणांची पालक या नात्यांनी जाणीव होणे गरजेचे आहे
'